महाराष्ट्राचा भूगोल (maharashtra bhugol) maharashtra geography in marathi

विविध स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधी बेसिक प्रश्न विचारले जातात. आपण येथे महाराष्ट्राच्या बेसिक भूगोलासबंधी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

        महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.की.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 1ला राजस्थान-3,42,239 चौ.की.मी. , 2रा मध्ये प्रदेश-3,08,252 चौ.की.मी.) देशात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी महाराष्ट्राने 9.36 टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती आहे. महाराष्ट्रचा अक्षय वृत्तीय विस्तार 150 उत्तर ते 2201 असा आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 7206 पूर्व ते 8009 पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे.

      1 मे 1960 ला स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या 26 होती जी नंतर वाढून 36 झाली आहे. म्हणजेच सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदा, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे.
      महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या पुढील प्रमाणे सांगता येतील. मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, ठाणे, कल्याणडोंबिवली, पिंपरी-चिंचवड,उल्हासनगर, सांगली-मिराज-कुपवाड,नांदेड-वाघाळा, आकोला, मालेगाव, भिवंडीनिजामपुर, मीरा-भाईंदर, जळगाव, धुळे, अहमदनगर, वसई-विरार, लातूर, चंद्रपुर, परभणी
      महाराष्ट्रास 720 की.मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार 800 की.मी. आहे. राज्याची राजधानी मुंबई असून उपराजधानी नागपूर आहे.  
 

महाराष्ट्र राज्याला भिडणार्‍या सीमा 

·         पश्चिमेस अरबी समुद्र
·         वायव्येस गुजरात आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेस
·         उत्तरेस मध्येप्रदेश
·         पूर्व व ईशान्येस छत्तीसगढ
·         दक्षिणेस गोवा व कर्नाटक
·         आग्नेयेस तेलंगणा 
 

महाराष्ट्राचे इतर राज्यांना भिडणारे जिल्हे

     कर्नाटक —–नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सुंधुदुर्ग
गोवा———–सिंधुदुर्ग
     मध्येप्रदेश —–गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार
     छत्तीसगढ——गडचिरोली, गोंदिया
      तेलंगणा ——-गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
      गुजरात धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर
 

महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती

·        सिंधुदुर्ग—————-1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
·        जालना—————–1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
·        लातूर——————-16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
·        गडचिरोली————–26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
·        मुंबई उपनगर———1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
·        वाशिम—————–1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
·        नंदुरबार—————-1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
·        हिंगोली—————-1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
·        गोंदिया—————-1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
·        पालघर—————–2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन
 

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग (vibhaag)

     महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभागांचा समावेश होतो. ते खालीलप्रमाने सांगाता येतील
कोकण——-मुख्यालय मुंबई
      या प्रशासकीय विभागात एकूण सातजिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढीलप्रमाणे सांगता येतील. पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग
पुणे———-मुख्यालय पुणे
      या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.
नाशिक——–मुख्यालय नाशिक
      या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव.
औरंगाबाद——मुख्यालय औरंगाबाद
      औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्याचा समावेश होतो. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
अमरावती——मुख्यालय अमरावती
      या विभागात एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे सांगता येतील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम.
नागपुर ———-मुख्यालय नागपूर
      या विभागात एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
 

महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग

कोकण —-
      सहयद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान पसरलेल्या अरुंद किनारपट्टीस कोकण असे म्हणतात. यात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
देश—–
     सहयद्रीच्या पूर्वेस असणार्‍या प्रदेशास देश असे म्हणतात. यामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो.
घाटमाथा—–
      सह्याद्रीच्या पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.
मावळ——
      सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ म्हणून ओळखला जातो.
खांदेश——
      उत्तर महाराष्ट्रातील खोर्‍यातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांच्या समुहास खांदेश असे म्हणतात. येथील कापूस व केळी ही पिके प्रसिद्ध आहेत.
मराठवाडा——
      मराष्ट्रातील गोदावरीच्या खोर्‍यास मराठवाडा असे म्हणतात.  यात औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो ते पुढील प्रमाणे सांगाता येईल जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, लातूर, हिंगोली.
विदर्भ——–
      या भागात एकूण आकरा जिल्ह्यांचा समावेश होतो. ते जिल्हे पुढील प्रमाणे सांगता येतील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, वाशिम गोंदिया. पूर्णा, वर्धा, पेनगंगा, वेनगंगा. या नद्यांच्या खोर्‍याचा समावेश विदर्भात होतो. या प्रदेशास वर्‍हाड नावानेही ओळखतात.
 

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग  

     देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंगाचा समावेश महाराष्ट्रात होतो. पुढील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहेत.
·        भीमाशंकर——————————पुणे
·        परळी वैज्यनाथ————————बीड
·        औंढा नागनाथ————————हिंगोली
·        त्र्यंबकेश्वर—————————–नाशिक
·        घृष्णेश्वर——————————औरंगाबाद
 

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने (udyaane)

      महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो.
·         तडोबा राष्ट्रीय उद्यान————————चंद्रपुर
·         नवेगाव राष्ट्रीय उद्यान———————-गोंदिया
·         पेंच राष्ट्रीय उद्यान—————————नागपुर
·         गुगामल राष्ट्रीय उद्यान———————अमरावती
·         संजय गांधी राष्ट्रीय उद्यान—————–बोरीवली (मुंबई)
महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.
 

महाराष्ट्रात असलेले अभयारण्य

·         अंधारी———————–चंद्रपुर
·         बोर—————————वर्धा
·         टिपेश्वर———————यवतमाळ
·         नागझिरा———————-भंडारा
·         भामरागड——————–गडचिरोली
·         चपराळ———————–गडचिरोली
·         मेळघाट———————–अमरावती
·         नर्नाळा——————–—-–अकोला
·         वान—————————अमरावती
·         अंबाबरवा———————-बुलढाणा
·         नांदूर मध्यमेश्वर—————नाशिक
·         यावल—————————-जळगाव
·         कळशुबाई हरिश्चंद्र गड——–अहमदनगर
·         गौताळा औटरमघाट————औरंगाबाद, जळगाव
·         जायकवादी पक्षी अभयारण्य—————औरंगाबाद, अहमदनगर
·         नायगव मयूर अभयारण्य——————बीड
·         येडसी  रामलिंगघाट———————उस्मानाबाद
·         अनेर डॅम——————–————-धुळे
·         काटेपूर्णा———————————अकोला, वाशिम
·         पैनगंगा————————————–यवतमाळ
·         ज्ञानगंगा————————————–बुलढाणा
·         कारंजा-सोहळ———————————-अकोला
·         लोणार अभयारण्य—————————-बुलढाणा
·         कर्नाळा पक्षी अभयारण्य———————ठाणे
·         तानसा—————————————ठाणे
·         फनसाड————————————–रायगड
·         भीमाशंकर———————————–पुणे
·         माळढोक अभयारण्य—————-पुणे, सोलापूर, अहमदनगर
·         रेहकुरी अभयारण्य————————-अहमदनगर
·         मयूरेश्वर-सुपे———————————–पुणे
·         राधानगरी अभयारण्य———————–कोल्हापूर
·         सागरेश्वर अभयारण्य————————-सांगली
·         कोयना अभयारण्य—————————-सातारा
·         चांदोली अभयारण्य——————सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
·         मालवण सागरी अभयारण्य——————-सिंधुदुर्ग
·         तुंगरेश्वर अभयारण्य—————————ठाणे
 

महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे

·        खोपोली ———————रायगड
·        कोयना————————सातार
·        भंडारदरा———————–अहमदनगर
·        जायकवाडी——————–पैठण
·        पेंच—————————–नागपुर
·        भिरा—————————–रायगड
·        पवना—————————-पुणे
·        वैतरणा————————–नाशिक
·        भाटघर————————–पुणे
·        तिल्लारी———————–सिंधुदुर्ग
·        भिवपुरी————————रायगड
·        येल्दरी—————————परभणी
 

महाराष्ट्रातील महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग (कंसात त्या महामार्गास दिलेले नवीन नंबर दिले आहेत )

     खाली महामार्गाची लांबी केवळ महाराष्ट्रातील लांबी आहे. त्यांची भारतातील लांबी या पेक्षाही मोठी असू शकते.
·        महामार्ग क्रमांक 3 (NH 160 व NH 60) ————-मुंबई-आग्रा————-391 की.मी.
·        महामार्ग क्रमांक 4 (NH 48)———मुंबई-बंगलोर-आग्रा———371 की.मी.
·        महामार्ग क्रमांक-4ब (यात बदल नाही)——–नाव्हा-शेवा-पळस्पे———-27 की.मी.
·        महामार्ग क्रमांक 6 (NH 53)————धुळे-कोलकत्ता ———-813 की.मी.
·        महामार्ग क्रमांक 9 (NH 65)———-पुणे-विजयवाडा———–336 किमी
·        महामार्ग क्रमांक 13——–सोलापूर-चित्रदुर्ग———-43 किमी
·        महामार्ग क्रमांक 16 (NH 63)——-निजामाबाद-जगदलपुर—-50किमी
·        महामार्ग क्रमांक 17 (NH 66)———पनवेल-मंगलोर———-482 किमी  
·        महामार्ग क्रमांक 50 (NH 60)———पुणे नाशिक————–192 किमी
·        महामार्ग क्रमांक 69———-नागपुर-अब्दुल्ला गंज—55 किमी
·        महामार्ग क्रमांक 204 (NH 166 व NH 361)———रत्नागिरी-कोल्हापूर—-126 किमी
·        महामार्ग क्रमांक 211 (NH 52)———-सोलापूर-धुळे———-400 किमी. 
 
 

महाराष्ट्रातील महत्वाची शिखरे (shikhare)

·        कळशुबाई —————————1646 मी
·        साल्हेर———————————1567 मी
·        महाबळेश्वर—————————1438 मी
·        हरिश्चंद्र——————————-1424 मी
·        सप्तश्रुंगी——————————1416 मी
·        तोरणा———————————-1404 मी
·        अस्तंभा——————————–1325 मी
·        त्र्यंबकेश्वर—————————–1304 मी
·        तौला———————————–1231 मी
·        वैराट———————————–1177 मी
·        चिखलदरा——————————1115 मी
·        हनुमान———————————1063 मी
 
 
 

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

 
·         मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र——————–पाडेगाव(सातारा)
·         गवत संशोधन केंद्र—————————पालघर
·         नारळ संशोधन केंद्र————————–भाट्य (रत्नागिरी)
·         सुपारी संशोधन केंद्र————————–श्रीवर्धन (रायगड)
·         काजू संशोधन केंद्र—————————-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
·         केळी संशोधन केंद्र—————————-यावल (जळगाव)
·         हळद संशोधन केंद्र—————————दिग्रज (सांगली)
 

महाराष्ट्रातील नद्या

     महाराष्ट्रा मध्ये पुढील नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा, वैनगंगा, पैनगंगा, पूर्णा, कोयना, गिरणा, उल्हास, मुळमुठा, पंचगंगा, पेंच, मुळा, कण्हण, पवना, नीरा, इंद्रायणी, वशिष्ठी, कुंडलिका, तानसा, प्रवरा, बिंदुसरा, कुंडली, पांझरा,  नाग इत्यादि. 
 

राज्यातून जाणारे लोहमार्ग

·        मुंबई—दिल्ली (मध्ये रेल्वे)
·        मुंबई-दिल्ली (पश्चिम रेल्वे)
·        मुंबई-कोलकत्ता (मध्ये रेल्वे)
·        मुंबई-चेन्नई (मध्ये रेल्वे)
·        चेन्नई-दिल्ली
·        भुसावळ-सूरत
 

महाराष्ट्राची लोकसंख्या

      सन 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश पाठोपाठ दूसरा क्रमांक लागतो.  देशातील एकूण लोकसंख्ये पैकी महाराष्ट्राची 9.28 टक्के एवढी लोकसंख्या आहे. (अधिक माहिती साठी लोकसंख्येवर लिहिलेला आमचा सविस्तर लेख वाचा )


महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि त्यांची स्थापना

·        मुंबई विद्यापीठ (मुंबई)— 1857.
·        पुणे विद्यापीठ (पुणे)—-1949.
·        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपुर)—1925.
·        कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ (अमरावती)—1983
·        भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ (औरंगाबाद)—
·        शिवाजी विद्यापीठ (1963)—कोल्हापूर.
·        यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक)—1988
·        उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव)—1989.
·        स्वामी रमानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड)—1994  
 
 

महाराष्ट्रातील महानगरपालिका 

   महाराष्ट्रात 26 महानगरपालिका असून त्या पुढीलप्रमाणे सांगता येतील 

मुंबई, सोलापूर, नांदेड वाघाळा, अहमदनगर, नवी मुंबई, अमरावती, अकोला, वसई विरार, पुणे, ठाणे, मालेगाव(नाशिक), लातूर, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपुर, चंद्रपुर, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, परभणी, नागपूर, उल्हासनगर, जळगाव, कोल्हापूर, सांगली (मिराज कुपवाडा), धुळे

महाराष्ट्राशी सबंधित इतर माहीत

·        भारताची आर्थिक राजधानी—मुंबई.
·        महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार —रायगड.
·        महाराष्ट्रातील मिठगरांचा जिल्हा—रायगड.
·        मुंबईची परसबाग—नाशिक.
·        महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेविकांचा जिल्हा— रत्नागिरी.
·        द्रक्षांचा जिल्हा –नाशिक
·        संत्र्यांचा जिल्ह—नागपुर
·        महाराष्ट्रातील केळीचा जिल्हा- जळगाव.
·        लेण्यांचा जिल्हा–औरंगाबाद.
·        आदिवासींचा जिल्हा —नंदुरबार.
·        साखर कारखान्यांचा जिल्हा—अहमदनगर.
·        महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार—सोलापूर.
·        महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा—यवतमाळ
 
महाराष्ट्राशी सबंधित प्रश्नोत्तरे
  • महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ? उत्तर —– 9.7 टक्के 
  • महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ? उत्तर –मध्ये प्रदेश . 
  • महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? उत्तर —-रत्नागिरी. 
  • महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ? उत्तर — गोंदिया. 
  • महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ? उत्तर —रत्नागिरी. 
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? उत्तर — सिंधुदुर्ग. 
  • महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ? उत्तर–नाशिक 
  • महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?–-उत्तर –अंबोली (सिंधुदुर्ग).
  • महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर —ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे. 
  • विदर्भातील नंदनवन कोणते? उत्तर-—चिखलदरा. 
  • संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे? उत्तर —-शेगाव जिल्हा बुलढाणा
  • महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? उत्तर–नाशिक 
  • महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? उत्तर–नाशिक. 
  • महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? उत्तर—-सातपुडा
  • महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर–यवतमाळ. 
  • महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? उत्तर—national highway 6
  • स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? उत्तर- भगुर (जी नाशिक ). 
  • महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? उत्तर–नांदेड. 
  • महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? उत्तर–सोलापूर. 
  • छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? उत्तर—कोल्हापूर येथे 1895 ला. 
  • महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? उत्तर–अमरावती. 
  • पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर–जुन्नर
  • पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? उत्तर—भीमा. 
  • महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता? उत्तर—प्रवरानगर(जी अहमदनगर ). 
  • महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —36. 
  • महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?उत्तर —- गोदावरी. 
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर—गोदावरी. 
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता? उत्तर—अहमदनगर. 
  • संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ? उत्तर—अमरावती. 
  • यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले? उत्तर—प्रीतिसंगम 
  • भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर–कर्नाळा जिल्हा रायगड
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? उत्तर—मोझरी (जी. अमरावती.)
  • महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? उत्तर–कोयना प्रकल्प. 
  • महाराष्ट्रातील मातीचे धरण ? उत्तर–गांगपूर जिल्हा नाशिक
  • महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? उत्तर–औरंगाबाद. 
  • लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर—बुलढाणा.  
 
        महाराष्ट्र पठाराची ऊंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. 

महाराष्ट्रातील समुद्र किनारा लाभलेले जिल्हे

  • पालघर – 102 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • ठाणे – 25 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • मुंबई व मुंबई उपनगर – 144 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • रायगड – 122 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • रत्नागिरी – 237 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • सिंधुदुर्ग – 120 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे

  • महाराष्ट्रातील धरणे व त्यांची जलाशये

    धरणे/प्रकल्पजलाशय
    जायकवाडी नाथसागर
    पानशेत तानाजी सागर
    भंडारदरा ऑर्थर लेक/ विल्सन डॅम
    गोसीखुर्दइंदिरा सागर
    वरसगाव वीर बाजी पासलकर
    तोतलाडोह मेघदूत जलाशय
    भाटघर येसाजी कंक
    मुळा ज्ञानेश्वर सागर
    मांजर निजाम सागर
    कोयना शिवाजी सागर
    राधानगरी लक्ष्मी सागर
    तानसा जगन्नाथ शंकरशेठ
    तापी प्रकल्प मुक्ताई सागर
    माणिक डोह शहाजी सागर
    चांदोली वसंत सागर
    उजनी यशवंत सागर
    दूधगंगा राजर्षी शाहू सागर
    विष्णुपुरी शंकर सागर
    वैतरणा मोडक सागर
    धरणे व त्यांचे जलाशय
    Sharing Is Caring:

    लोकांसाठी जास्तीत जास्त व्हॅल्यु क्रिएट करण्याचा उद्देश मी सतत मनात बाळगून असतो. आणि हाच उद्देश समोर ठेऊन मी mpscmaster.in ची सुरुवात केली आहे, त्याच दृष्टीने मी पुढेही कार्य करत राहील तसेच लोकांना जास्तीत जास्त फायदा पोहचवणार्‍या संसाधनांची निर्मिती करत राहील. आयुष्यभरात 14 कोटी लोकांना फायदा पोहचवण्याच्या ध्येयातील हे पहिले पाऊल आहे. धन्यवाद.

    Leave a Comment